Posts

Showing posts from January, 2025

Climate Change

Climate Change ' नेमिची  येतो  मग  पावसाळा ...' वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात. दरवर्षी पावसाचे आगमन होते. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा! एकंदरीतच वरील ओळीतून आपल्याला हा अर्थ बोध होतो. या वर्षी जुन महिन्यात प्रत्येक आठवड्यात एकदा तरी जंगलात जाणे झालेच.  तसे ते दरवर्षी होतेच परंतू करोना मुळे गेल्या दोन-तीन वर्षात या मधे खंड पडला होता. जूनचा पहिला आठवडा पहिल्या आठवड्यात जंगलात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.  पक्षी आपापल्या जोड्या जमवण्यात मग्न होते, त्यांच्या मधुर कोर्टशीप काॅल्सनी आसमंत भरून गेला होता.  सुंदर सुंदर फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर पडून जोडीदाराच्या शोधात भिरभिरत होती.  जंगलात बहुतांश ठीकाणी उतारावर, मोकळ्या रानात कारवी ही दर सात-आठ वर्षांनंतर फुलणारी झुडपी वनस्पती भरपूर प्रमाणात होती.  ती मार्च पासूनच पूर्णपणे निष्पर्ण झाली होती. खुपश्या झाडा झुडपांना मोहक पालवी फुटत होती.  जंगल सरड्यांच्या नरांना गळ्या भोवती भड़क रंग आले होते व  त्यांची मादीला रिझवण्यासाठी पळापळी, द्वंद युद्ध सुरू होते....

घाट रस्ते आणि पुल

"घाट रस्ते आणि पुल" सह्याद्रि म्हणजेच पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला,बहरलेला प्रदेश आहे.  या पश्चिम घाटातील जंगलात असंख्य प्राणी, वनस्पती, किटक, मासे, पक्षी, फुलपाखरे इ वन्यजीवांची रेलचेल असते.  या पैकी अनेक वन्यजीव हे प्रदेशानिष्ठ आहेत, म्हणजेच ते फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच आढळतात.  जगात इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत. म्हणूनच या पश्चिम घाटाला जागतिक मेगा बायोडायव्हर्सीटी हाॅट स्पाॅट चा दर्जा दिला गेला आहे. तसेच हा जागतिक वारसा स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहेच. अश्या या पश्चिम घाट पार करायला अनेक घाट रस्ते तयार करण्यात आले आहेत. तर अजून बरेच नवीन घाट रस्ते प्रस्तावित आहेत.  हे घाट रस्ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण यांना जोडतात.  हा प्रदेश उंच आणि डोंगर दर्यांनी भरलेला असल्याने तेथे घनदाट जंगल आहे.  या ठिकाणी पर्जन्यमान देखील जास्त असते.  अति वृष्टि तर नेहमीच होत असते.  हे घाट रस्ते बनविताना आडव्या येणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर, नाल्यावर पुल बनविले आहेत.  परंतु हे पुल बांधते वेळी या ओढ्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा कोणताही अभ्यास न करता नळे...

बर्ड मॅन ऑफ इंडिया - डाॅ सालिम अली

बर्ड मॅन ऑफ इंडिया  - डाॅ सालिम अली .. 12 नोव्हेंबर 1896 रोजी मुंबई येथे बोहरा कुटुंबात त्यांचा जन्‍म झाला.. जन्‍मानंतर वर्षभरातच वडील मोईजुद्दीन यांचे निधन झाले  आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी आई झिनत उल निस्सा चेही निधन झाले.. आणि ते अल्प वयातच अनाथ झाले. त्यांचा मुक्काम कधी मामाकडं तर कधी काकीकडं हलला.. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी छर्याच्या बंदुकीने एका चिमणीची शिकार केली. जेव्हा त्यांनी ती चिमणी उचलली तेव्हा तिचा कंठ पिवळा असल्याचे दिसले. हे काही तरी वेगळेच आहे हे लक्ष्यात आल्यावर कुतूहल पूर्वक त्यांनी ती चिमणी मामा amiruddin यांना दाखवली. हे मामा वाईल्‍ड लाईफ सोसायटी अन् बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीचे सदस्य होते.. मामा त्यांना घेऊन BNHS येथे घेऊन गेले तेथे तत्कालीन मानद सचिव W S मीलार्ड यांनी सालिम अलीं चा इंटरेस्ट बघून त्यांना BNHS मधील पेंढा भरून ठेवलेले असंख्य पक्षी दाखवले.  ते पाहून सालिम अली पूर्णपणे भारावून गेले.  तो एक क्षण होता ज्यानं त्यांचं आख्खं आयुष्यच बदलवून टाकलं.. त्यांना पक्ष्यांचा नादच लागला.. इतका की त्यांनी आपलं पुढील सर्व आयुष्य पक्ष...